new-img

पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५जुलै ही होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अजुनही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित राहीले त्यांना पिक विमा भरण्याची मुदत मिळावी, यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मुदतवाढ मिळावी अशी मागणी सरकारकडे केली होती. आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार 31 जुलै पर्यंत अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळेउर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा 31 जुलै पर्यंत भरून घ्यावा. असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.